खासदार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. राणे भाजपमध्ये जातील अशीही चर्चा सुरू झाली होती. असं झालं तर महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचं काय होणार याबाबत तर्क लढवले जात होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्याबाबत मोठा खुलासा केलाय.
People of Maharashtra are in favour of BJP-Shiv Sena alliance in Assembly polls, says Devendra Fadnavis during outreach campaignमुख्यमंत्री म्हणाले, मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावलं होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला असं स्पष्टिकरणही त्यांनी दिला. नारायण राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे असा खुलासाही त्यांनी केला. सर्व घटक पक्षांना आम्ही सामावून घेऊ असं सांगत त्यांनी घटक पक्षांना दिलासा दिला.