२०१९ मध्ये देशात काँग्रेसची सत्ताः अशोक चव्हाण
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जे यश मिळाले आहे ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मिळाले आहे. मोदींचा प्रभाव आता संपला असून राहुल गांधी यांचे नेतृत्व सिद्ध झाले आहे. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे भाकित काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज एका पत्रकार परिषदेत केले.
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या पाचही राज्यात काँग्रेसला चांगलं यश मिळाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पत्रकार परिषद आयोजित केली होती. काँग्रेसला या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. ईव्हीएमवर काँग्रेस कार्यकर्त्यांची करडी नजर होती.