‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ – आशिष शेलार

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी या परिस्थितीसाठी शिवसेनेला जबाबदार धरले आहे. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नाव न घेता शिवसेनेला टोला लगावला.
मुंबईत पावसामुळे जी परिस्थिती उदभवली त्याची जबाबदारी मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना नाकारता येणार नाही. ‘करुन दाखवलं’ म्हणणाऱ्यांनी ‘पळून दाखवलं’ असे शेलार म्हणाले. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईतील पावसाचा मतदानावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर शेलार म्हणाले कि, यापूर्वी आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली पण यावेळी भाजपा विजयाच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरला आहे. आम्ही नक्कीच विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाऊस असला तरी मतदारांमध्ये उत्साह आहे असे ते म्हणाले.

More videos

See All